Type Here to Get Search Results !

जिल्ह्यात २० व २२ मार्च रोजी यल्लो अलर्ट

प्रतिनिधी/वर्धा (मंगेश राऊत) :
                                           भारतीय हवामान खात्याने वर्धा जिल्ह्यात दि. २० व २२ मार्च रोजी यल्लो अलर्ट व दि.२१ मार्च रोजी ऑरेंज अलर्ट वर्तविला असून या कालावधीत जिल्ह्यातील काही ठिकाणी विजेच्या कडकडाटासह गारपीट होण्याची शक्यता वर्तविली आहे. तसेच त्यावेळी ४० ते ५० किलोमीटर प्रति तास वारे वाहण्याची शक्यता वर्तविली आहे. नागरिकांनी आवश्यक काळजी घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

  •     शेती :   गारपिटमुळे फळझाडे, भाजीपाला आणि इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान टाळण्यासाठी  शेतक-यांनी पिकांचे संरक्षण करण्याकरीता  तात्काळ उपाययोजना करव्यात.

  •  वाहतुक :   रस्ते गारांमुळे निसरडे होऊ शकतात. वाहनचालकांनी सावधगीरी बाळगावी. आवश्यक नसल्यास प्रवास टाळावा.

  • सार्वजनिक सुरक्षितता :  नागरिकांनी उघड्या जागेत जाण्याचे टाळावे. गारपिटीपासुन बचावासाठी सुरक्षित ठिकाणी असरा घ्यावा.

            विज गर्जना होत असताना शक्यतो घरातच राहणे आवश्यक आहे. अशा कालावधीमध्ये मोबाईल फोन सोबत बाळगू नये. विज गर्जना सुरू असताना घरातील इलेक्ट्रिकल उपकरणे बंद ठेवावी. पाऊस व विज गर्जना होत असताना चुकूनही झाडाच्या खाली उभे राहू नये व शेतात काम करत असताना सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा. प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे आणि हवामान खात्याच्या अद्यतनांकडे लक्ष द्यावे. घराबाहेर असल्यास मजबूत छताखाली आसरा घ्यावा. गारपीट होत असताना उघड्या जागेतून वाहन चालवण्याचे टाळावे. विजेच्या तारा किंवा खांबांच्या जवळ जाण्याचे टाळावे. अफवांवर विश्वास ठेवू नका व अफवा पसरवू नका. घडलेल्या घटनेची, आपत्तीची माहिती तात्काळ जिल्हा तसेच तालुका नियंत्रण कक्षास द्यावी.

            आवश्यक खबरदारी घेवून स्वतःची त्याच प्रमाणे आपल्या कुटूंबियांची व मित्र परिवाराची काळजी घ्यावी व प्रशासणकडून निर्गमित होत असलेल्या सुचणांचे पालन करून सहकार्य करावे. आपाकालीन परिस्थिती उद्भवल्यास जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती जिल्हा नियंत्रण कक्षाच्या  ०७१५२ - २४३४४६ , २९९०१० या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.  विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा आणि गारपिटीमुळे अपेक्षित प्रभाव आणि कृती सूचित


  •  अपेक्षित प्रभाव :    जोरदार वारा, गारपिटीमुळे वृक्षारोपण, बागायती आणि उभ्या पिकांचे नुकसान होऊ शकते. मोकळ्या ठिकाणी गारांमुळे लोक आणि गुरे जखमी होऊ शकतात. जोरदार वाऱ्यामुळे असुरक्षित संरचनांना आंशिक नुकसान, कच्च्या घरांचे/भिंती आणि झोपड्यांचे किरकोळ नुकसान. सैल वस्तू उडू शकतात.

  • कृती सुचवली : घरातच रहा, खिडक्या आणि दरवाजे बंद करा आणि शक्य असल्यास प्रवास टाळा. सुरक्षित निवारा ध्या; झाडाखाली आसरा घेऊ नका. काँक्रीटच्या मजल्यावर झोपू नका आणि काँक्रीटच्या भिंतींना झुकू नका. इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक उपकरणे अनप्लग करा. ताबडतोब जलकुंभातून बाहेर पडा. वीज चालवणाऱ्या सर्व वस्तूंपासून दूर राहा.

  • प्रदेशासाठी कृषीमाल सल्ला : फळबागांमध्ये गार जाळी किंवा गारांच्या टोप्या वापरा जेणेकरून त्यांचे यांत्रिक नुकसान होण्यापासून संरक्षण होईल आणि बागायती पिकांना यांत्रिक सहाय्य प्रदान करणे आणि भाजीपाला स्टॅक करणे. परिपक्व झालेली पिके आणि भाजीपाला लवकरात लवकर काढा आणि कापणी केलेले उत्पादन सुरक्षित ठिकाणी ठेवा किंवा शेतात कापणी केलेल्या उत्पादनांचे ढीग ताडपत्रीने झाकून टाका. बागायती पिके आणि भाजीपाला यांत्रिक आधार द्या. असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणच्या अध्यक्ष वान्मथी सी यांनी कळविले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad