प्रतिनिधी/वर्धा (मंगेश राऊत) :
म.ज्योतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे पुतळे नगर परिषदेच्या जागेत व स्मारक जुन्या न.प.पडक्या जागेत निर्माण न केल्यास वर्धा जिल्हा पुरोगामी व परिवर्तनवादी संस्था संघटना समन्वय समिती भिक मागून नगर परिषदेला पैसे देणार तरीही म. ज्योतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे पुतळे व स्मारक न झाल्यास करणार अन्नत्याग आंदोलन नगर परिषद प्रशासनाला दिला निवेदनातून इशारा.
वर्धा शहरात जवळ जवळ अनेक महापुरुषांचे पुतळे चौका चौकात उभे राहिले तर सावरकर यांचे भव्यदिव्य स्मारक तर राजमाता जिजाऊ,संत तुकडोजी महाराज यांचे छोटेसे स्मारक शहरात उभे करण्यासाठी आमदार, खासदार व नगर परिषदेने पुढाकार घेऊन उभे कले तर शहर विकास निधीतून आणि या सर्व पुतळ्यांचे सौंदर्यीकरण करण्याची मोहीमच मा आमदार डॉ पंकज भोयर यांनी आपला विकास निधी देवून केला मात्र म. ज्योतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा पुर्णाकृती पुतळा बसवावा त्यांचे स्मारक वर्धा शहरात निर्माण करावे अशी साधी कल्पना ना आमदार डॉ पंकज भोयर ना खासदार रामदास तडस, ना आमदार रामदास आंबटकर अथवा नगर परिषदेला आली हिच बाब लक्षात घेऊन वर्धा जिल्हा पुरोगामी व परिवर्तनवादी संस्था संघटना समन्वय समितीच्या वतीने महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य प्रधान सचिव गजेंद्र सुरकार यांच्या नेतृत्वात म. ज्योतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा पुर्णाकृती पुतळा नगर परिषदेच्या प्रांगणात किंवा नगर परिषदेचे प्रशासक यांच्या बंगल्याच्या बाजुला सौंदर्यीकरण करत असलेल्या जागेवर बसवावा.
तसेच नगर परिषदेच्या जुन्या पडीत जागेवर सरकारी रूग्णालया समोररील जागेत म.ज्योतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे भव्यदिव्य स्मारक उभारण्यात यावे जे सतत सर्वांना प्रेरणास्थान असेल यासाठी वर्धा नगर परिषदेचे प्रशासक यांना सहाय्यक प्रशासक मा मोटघरे यांच्या हस्ते निवेदन देऊन आंदोलनाचा इशारा निवेदनातून व चर्चेतून देण्यात आला.
छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी पहिल्यांदाच शोधून संपूर्ण जगाला त्यांची सर्वसामान्यांना चे राजे हि ओळख करून देणारे त्यांच्यावर पोवाडा लिहून त्यांचे कार्यकर्तृत्वाचा इतिहास मांडणारे पहिली शिवजयंती साजरे करणारे,ब्राम्हणी कर्मकांड विरूद्ध चळवळ उभी करून सत्यशोधक समाजाची स्थापना करून संघटन कौशल्य दाखविणारे, शेतक-यांचा आसुड हे पुस्तक लिहून शेतक-याची दैन्यावस्था सरकार व समाजा समोर ठेवणारे,शिक्षणाची गंगा संपुर्ण भारतभर पसरवून दिन दलित,आदीवाशी,भटके, अनुसूचित जनजाती ओ.बि.सी. अतिदलित महिला यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणारे. ज्यामुळेच आज राष्टपती पंतप्रधान, मुख्यमंत्री मंत्री ते मुख्य सचिव ,कलेक्टर, पोलिस अधीक्षक ते चपराशी पर्यंत नोकरीत सहभाग घेवू शकले तर अनेक लेखक,कवि,विचारवंत, आमदार खासदार झाले म्हणूनच डॉ बाबासाहेब आंबेडकर म.ज्योतिबा फुले यांना आपल्या गुरूस्थानी मानत होते.
मात्र अशा या दोन्ही महामानव असलेल्या म.ज्योतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा पुर्णाकृती पुतळा किंवा स्मारक वर्धा शहरात किंवा जिल्ह्यात निर्माण झाले नाही हि आंम्हा वर्धेकर व वर्धा प्रशासनासाठी , स्थानिक आमदार, खासदार यांच्यासाठी शरमेची बाब आहे कारण यामागे जातिय राजकिय मानसिकता,भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचार धारेवर चालणा-या संघटनांचा छुपा विरोध आहे हे आजही दिसून येते.पुण्यातही पहिल्यांदा म.ज्योतिबा फुले यांचा पुतळा बसवू नये म्हणून त्यावेळी टिळकांनी प्रखर विरोध केला होता व केसरीत भारताचे दुष्मण असा लेख टिळकांनी लिहला होता.
वर्धा जिल्ह्यातील सर्व आमदार खासदार,ओ.बि.सी.असूनही हा विरोधाभास आहे याला ब्राम्हणी प्रवृत्तीचा कावा मानावा काय असे चर्चे व्दारे मांडण्यात आले.ज्याला मुक संमती दिसली त्यामुळे वर्धा जिल्हा पुरोगामी व परिवर्तनवादी संस्था संघटना समन्वय समिती च्या वतीने दि. १७ जुनला धुनिवाले मठात आयोजित सत्कार समारंभात या विषयावर सर्व वक्त्यांनी विचार व्यक्त करताना वरील मागणीचे निवेदन देऊन पुढील आंदोलनाची दिशा सर्वानुमते गजेंद्र सुरकार यांनी ठेवलेल्या ठरावाला अनुमोदन दिले त्याप्रमाणे पुढील निर्णय घेण्यात आला.
नगर परिषद प्रशासनाच्या पुढाकाराने नविन नगर परिषद इमारतीच्या आवारात किंवा पाण्याची टाकीखाली नगर परिषद सुरू होती त्या परिसरात समोरील मोक्याच्या जागेवर किंवा त्या चौकात पुर्णाकृती पुतळा बसवावा तसेच नगर परिषदेच्या जुन्या पंडीत जागेवर (सरकारी रूग्णालया समोर) जागेवर म.ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे भव्यदिव्य स्मारक उभारण्यात यावे हि सर्व वर्धेकरांची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
वर्धा नगर परिषदेच्या प्रशासकांनी यावर विचार पुर्वक मंथन करून आंम्हा वर्धेकरांच्या योग्य असलेल्या व इमानदारीने वर्धा नगर परिषदेला घरटॅक्स व पाणिकर भरणा-या नागरीकांची मागणी मान्य करावी अशी सविनय विनंती वर्धा नगर परिषद प्रशासकांना करण्यात आली असून मागणी मान्य न झाल्यास आंम्ही वर्धेकर नगर परिषदेकडे म ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा पुतळा बसविण्यासाठी आणि स्मारक बनविण्यासाठी पैसे व मानसिकता नाही असे बॅनर बनवून वर्धा जिल्हात भिक मांगो आंदोलन राबवून जमा केलेला निधी वर्धा नगर परिषदेचे प्रशासक यांना देण्यात येईल तरीही नगर परिषद प्रशासनाने निर्णय न घेतल्यास आंम्ही वर्धेकर नगर परिषद समोर बेमूदत अन्नत्याग आंदोलन करू ज्याची सर्व जबाबदारी प्रशासनावर राहील असा इशारा निवेदनातून व चर्चा करून देण्यात आला.
यावेळी शिष्टमंडळात विविध संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते जे वर्धा जिल्हा पुरोगामी व परिवर्तनवादी संस्था संघटना समन्वय समितीच्या बॅनर खाली एकत्र येऊन त्यांनी संघर्ष समितीची स्थापना केली असे गजेंद्र सुरकार, गुणवंत डकरे,नुतन माळवी,विनय डहाके, पुंडलिक नागतोडे,भरत चौधरी प्रमोद खोडे रमेश ठोसरीवाल रविन्द्र हिवरकर नरेंद्र चर्जन डॉ अविनाश गवळी विल्सन मोखाडे, भैय्या देशकर शारदाबाई झामरे ॲड पोशर हे उपस्थित होते तर यांच्या सह १८९ लोकांच्या नावे व सहीसह निवेदनावर सही केल्या गेली व हे निवेदन देण्यात आले.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या