Type Here to Get Search Results !

प्रवीण खानझोडे यांचा शिवसेना (उबाठा) गटाला जय महाराष्ट्र

वणी : 

       प्रवीण खानझोडे यांनी आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाशी आपला राजकीय संबंध संपुष्टात आणत असल्याचे जाहीर केले आहे. याबाबत त्यांनी प्रसिद्धी माध्यमांना निवेदन जारी करून आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

               खानझोडे यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, चार वर्षांपूर्वी यवतमाळ येथे झालेल्या शिवसेना कार्यकर्ता मेळाव्यात, तत्कालीन पालकमंत्री आणि जिल्हाप्रमुख संजय राठोड तसेच वणी येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष आणि विद्यमान आमदार संजय देरकर यांच्या नेतृत्वात त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. गेल्या काही वर्षांपासून ते पक्षात कार्यरत होते. मात्र, खाजगी कारणांमुळे आणि वेळेच्या अभावामुळे ते पक्षकार्यात पुरेसा वेळ देऊ शकत नाहीत. त्यामुळे त्यांनी आज, १ सप्टेंबर २०२५ पासून शिवसेना (उबाठा) गटाशी कोणताही राजकीय संबंध ठेवणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

          खानझोडे यांनी पुढे असेही नमूद केले की, शिवसेना पक्षातील सर्व नेते, सहकारी आणि मित्रपरिवार यांच्याशी त्यांचे स्नेहाचे आणि आपुलकीचे संबंध कायम राहतील. त्यांनी पक्षातील सर्व सहकाऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे. या निवेदनानंतर प्रवीण खानझोडे यांच्या पुढील राजकीय वाटचालीबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. शिवसेना (उबाठा) गटाकडून याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad