वणी :
येथे दिनांक १४ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ०९:३० वाजता "तिरंगा रॅली" चे आयोजन करण्यात आले आहे. "तिरंगा आहे अभिमान, तेवू त्याच उदेव मन" (तिरंगा अभिमान आहे आणि आम्ही त्याचा सन्मान करतो) या थीमसह राष्ट्रीय अभिमान साजरा करण्यासाठी तसेच स्वातंत्र्य दिनापूर्वी स्वातंत्र्याचे आणि स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व आणि तरुणांमध्ये जागरूकता वाढवण्यासाठी ही रॅली आयोजित केली आहे.
या रॅलीची सुरुवात वणीतील विश्रामगृह पासून होईल आणि शहरातील विविध ऐतिहासिक आणि महत्त्वाच्या ठिकाणांमधून जाईल, ज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौक, खाती चौक, महात्मा गांधी चौक, संत गाडगेबा बाबा चौक, शहीद भगतसिंग चौक, सवोदय चौक, रवींद्रनाथ टागोर चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक आणि लोकमान्य टिळक चौक यांचा समावेश आहे. या रॅलीचा समारोप लोकमान्य टिळक चौक येथे होणार आहे.
या पायी रॅलीत शहरातील सामाजिक संस्था, शैक्षणिक संस्थांचे विद्यार्थी-विद्यार्थिनी, तसेच विविध धार्मिक व सांस्कृतिक संघटना सहभागी होणार आहे.ही रॅली कोणत्याही राजकीय पक्षाचे बॅनर किंवा झेंडे न लावता केवळ वणीकरांची आहे. वणी तालुक्यातील सर्व नागरिक आणि संस्थांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या