या प्रकारचा विषयावर लिहावं, अस खूप दिवसापासून सुरू होत. सततच्या व्यस्ततेमुळे जमत नव्हतं. मात्र आज हा विषय मांडण्याचं कारण आहे. की मी कोकण दौऱ्यामध्ये बघितलेले संगमेश्वर.
संगमेश्वर हे नाव ऐकलं नाही असा एकही व्यक्ती आज महाराष्ट्रात नाही. स्वराज्याचे दुसरे छत्रपती, संभाजी महाराज यांना ज्या ठिकाणी अटक करण्यात आली. ते ठिकाण म्हणजे संगमेश्वर.मोजक्या सहकाऱ्यांना घेऊन सरदेसाई यांच्या वाड्यावर स्वराज्य विस्ताराच्या मोहिमेवर असताना संभाजी महाराज यांना 'इकलास खानाने' अटक केली. यावेळी इतिहास सागण्याचे काही कारण नाही. विषय आहे की, आज त्या ठिकाणी असणारे वाडे पडक्या अवस्थेत आहे.
दुसरं ठिकाण आहे. संगीत सूर्य केशवराव भोसले संस्कृतिक नाट्यगृह कोल्हापूर. तशी कोल्हापूर हे ठिकाण संस्कृतिक दृष्टया संपन्न आहे. हे नाट्यगृह जाळलं. पुढे नाट्यगृह दुरस्ती संबंधाने काय सुरू आहे? कुणास ठावूक. की कायमच नामशेष होणार ?
तसेच महाराष्ट्रामध्ये अनेक गडकिल्ले आहे. त्यातील अनेक गड अक्षरशः तुटून पडले. नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. हा विषय घेऊन कोणीही काम नाही.
औरंगाबाद, अहमदनगर विदर्भातील भंडारा, नागपूर या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात बैद्ध स्थळ आहे. या अनेक स्थळांचे मंदिरामध्ये रूपांतर झाले. त्यावर भट ब्राह्मणांची रोजगार हमी योजना सुरू आहे. अनेक स्थळ जीर्ण झालेली आहे. दुर्लक्षित आहे.
अश्या प्रकारच्या वास्तू सोबतच बहुजन समाजाला संपन्न व्हावा यासाठी अनेक महापुरुषाने आपली हयात खर्ची घातली. आज या महापुरुषांचे नाव समाज विसरून जात आहे. यामध्ये चंद्रपूर येथील अँड. एकनाथ राव साळवे, बॅरिस्टर खोब्रागडे, नागपूर येथील बजाज कुटुंबातील लोक ज्यांनी इग्रजी सत्येविरुद्धा झेंडा मोर्चा काढला, सांगली येथील शांतिनिकेतन लोकविद्यापिठाचे प्राच्यार्य पी. बी. पाटील, यवतमाळ येथील डॉ. पंजाबराब यांचे सोबत काम करणारे बुटे सर आणि त्यांचे सहकारी. वणी जिल्हा यवतमाळ येथील माजी आमदार कॅम्रेड भाई काळे यासह महाराष्ट्रात अनेक चळवळीतील अनेक लोक आहे ज्यांचे चरित्र प्रेरणादायी आहे. ते समोर येणे गरजेचे आहे.
तश्याच प्रकारच्या काही समाज परंपरा आहे. ज्यामधून समृद्ध बहुजन इतिहास दर्शवित असते. आज या सर्व परंपरा खंडित होत आहे.
अशा परंपरा, महापुरुष, स्मारक, प्रेरणासस्थळ कोण जपणार. आजचे बहुजन राजकारणी नेते हे संस्कृतिक दृष्टया अत्यंत फकीर आहे. त्यांना या विषयाचे सोयर - सुतक नाही. त्यांना त्यात रस नाही एवढं ठीक होत. पण बहुजन नेते त्याही पुढचे आहे. स्मारकाच्या जागा आपल्याच मिळाव्या, महापुरुषाच्या कार्याने तयार झालेल्या परिस्थितीने आपलाच फायदा व्हावा. एवढी विकृती आपल्या राजकारणी नेत्यांमध्ये भरलेली आहे. ही विकृती विकृत स्वस्करातून आली. हल्ली राजकारण हा फारच विकृत लोकांचा अड्डा झाला आहे. या सर्व लोकांना या विषयाचं गांभीर्य नाही. आगदी आजचा जानता राजा यांना सुद्धा. या विषयावर काम करण्यासाठी समाजातील काही धुरिणांनी स्वतः समोर यावं. संघटन करावं आणि काम करावं. जेवढं होईल तेवढच काम पुढे जाईल.
धन्यवाद
दत्ता डोहे,
वणी, यवतमाळ
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या