लोकसभा निवडणुकीवेळी महाविकास आघाडीमध्ये सांगली मतदारसंघाबद्दल काय घडलं, ते सगळ्या महाराष्ट्राने पाहिले. काँग्रेसचा पारंपरिक मतदारसंघ असलेल्या या जागेवर ठाकरेंनी दावा केला आणि जागावाटपा आधीच उमेदवारही जाहीर केला. काँग्रेसच्या नेत्यांनी आणि मतदारांनी आघाडी धर्म बाजूला ठेवून अपक्ष विशाल पाटलांना विजयी केले. यालाच सांगली पॅटर्न म्हटलं गेलं. अशीच काही राजकीय स्थिती वणी विधानसभा मतदारसंघात निर्माण झाली आहे. काँग्रेसचे संजय खाडे यांनी उमेदवारी न मिळाल्याने अपक्ष अर्ज दाखल करून निवडणूक रिंगणात उतरले आहेत.
गेली 10 वर्षे भाजपचा आमदार असूनही वणीमधील मूलभूत समस्याही सुटलेल्या नाहीत. त्यामुळे वणी मधील नागरिकांचा भाजप आणि महायुतीविरोधात प्रचंड रोष आहे. त्यामुळे वणी विधानसभा मतदारसंघात यावेळी बदल नक्की घडणार असेच वातावरण जनमानसात पाहायला मिळत आहे. वणीकरांची साथ सोबत शिवसेनेचे विश्वास नांदेकर आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नरेंद्र पाटील ठाकरे यांची साथ अपक्ष उमेदवार संजय खाडे यांना मिळत आहे. त्यामुळे शहर आणि परिसरात 'शिट्टी' ला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत आहे.
वणी विधानसभेत महायुतीचे उमेदवार आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, महाविकास आघाडीचे उमेदवार संजय देरकर, मनसे चे उमेदवार राजु उंबरकर आणि अपक्ष संजय खाडे यांच्यात चौरंगी लढत होत आहे. संजीवरेड्डी बोदकुरवार हे सलग दोन वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत.विविध समस्येने त्रस्त झालेल्या जनतेला या मतदारसंघात बदल हवा असल्याने अपक्ष उमेदवार संजय खाडे यांचे पारडे जड आहे. मतदारसंघात प्रचारादरम्यान विद्यमान आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. गावागावात आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांना विविध प्रश्न विचारले जात असल्याने त्यांची कोंडी झाली.
नरेंद्र ठाकरे प्रचारात जनतेशी संवाद साधत आहे, शेतमालाला भाव मिळत नसल्याने शेतकरी त्रस्त झाले आहे. सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांमुळे शेतक-यांचा उत्पादन खर्चही निघणे मुश्कील झाले आहे. शेतक-यांनी यावेळी संजय खाडे यांच्या पाठिशी उभे राहावे. संजय खाडे हे शेतकरी आहे. त्यांच्या पाठपुराव्यामुळे अनेक शेतक-यांचे प्रश्न सुटले. त्यांना शेतक-यांच्या प्रश्नांची जाण आहे. त्यामुळे त्यांच्यासारख्या शेतक-याला विधानसभेत पाठवणे गरजेचे आहे.
प्रचार सभेतून संजय खाडे जनतेला आवाहन करत आहे, गेल्या अनेक वर्षांपासून जनसेवा हिच ईश्वसेवा हेच समजून मी सामाजिक कार्य, लोकसेवा करीत आहे. यावेळी मतदारांनी संधी दिल्यास हेच तत्व पाळून यापुढेही असेच कार्य सुरु राहिल. त्यामुळे आता ही निवडणूक जनतेने आपल्या हाती घ्यावी. शेतमाला भाव नाही. शेतक-यांचा उत्पादन खर्च देखील निघत नाही. त्यामुळे कर्जबाजारी होऊन आपल्या परिसरातील शेतकरी आत्महत्या करीत आहे. मात्र आपले लोकप्रतिनिधींनी शेतक-यांचा एकही प्रश्न विधानसभेत उचलला नाही. मतदारसंघात विकासाच्या नावावर निकृष्ट दर्जाचे कामं झाली आहेत. रस्त्याला अवघ्या चार महिन्यात खड्डे पडत आहे. खेडोपाडी पांदण रस्ते नाहीत. असा घणाघात खाडे यांनी सभेत केला. यासह शेतक-यांचे प्रश्न प्रभावीपणे मांडण्यासाठी मतदारांनी एक संधी द्यावी, असे आवाहन सभेतून करत आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या