अनेक आंदोलनासाठी ज्या भूमीनी प्रेरणा दिली अशा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज निर्मित गुरुकुंज आश्रम मोझरी या ठिकाणी, प्रहार जनशक्ती पक्षाचे सर्वेसर्वा, दिव्यांग जनतेचे तारणहार, माजी आमदार माननीय बच्चुभाऊ कडू यांनी शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफी सह शेतकरी, शेतमजूर, दिव्यांग इत्यादी घटकांचे अनेक विषय घेऊन अन्नत्याग आंदोलन पुकारलेले आहे. या आंदोलनाला पंजाब मधील शेतकरी नेते राकेशजी टीकेत यांच्यासह महाराष्ट्र आणि देशभरातील अनेक सामाजिक संघटना, राजकीय पक्ष यांनी आपला पाठिंबा दर्शवला आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रामध्ये क्रांतिकारी संघटना म्हणून ओळख असणाऱ्या संभाजी ब्रिगेडने सुद्धा माननीय माजी आमदार बच्चुभाऊ कडू यांनी उभारलेल्या अन्नत्याग आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिलेला आहे.
हा पाठिंबा दर्शवण्यासाठी आज दिनांक 12 जून 2025 ला संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष माननीय मनोजदादा आखरे जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्ष माननीय सीमाताई बोके यासह मराठा सेवा संघाचे अरविंद जी गावंडे. संभाजी ब्रिगेडचे प्रदेश प्रवक्ते प्रेमकुमार बोके, अजय धोबे, गजानन भोयर, आशिष रींगोले शंकररावजी पूनवटकर, राजू ताजने, भाऊसाहेब आसुटकर इत्यादीनी उपस्थिती दर्शवली.
या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिनांक 14 जून रोजी संपूर्ण महाराष्ट्रभर बंदचे आव्हान करण्यात आलेले आहे याच दरम्यान संभाजी ब्रिगेडच्या वतीने आपल्या वणी शहरांमध्ये बंद पाळण्यात येणार आहे. अशी माहिती माननीय अजय धोबे जिल्हाध्यक्ष संभाजी ब्रिगेड यांनी दिलेली आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या