प्रहार जनशक्ती पक्षाचे वणी येथे शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी आज ९ जून रोजी तहसील कार्यालयासमोर साकळी उपोषणाला सुरुवात झाली आहे. शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे, पेरणी ते कापणी पर्यंत चा खर्च एम आर इ जी एस मधून करण्यात यावा, दिव्यांग बांधवांना ६०००/रुपये मासिक मानधन देण्यात यावे, मनरेगा मधली मजुरी ५०० करण्यात यावी, शेतकऱ्याप्रमाणे शेतमजुराचा अपघाती मृत्यू झाल्यास त्याला नुकसान भरपाई देण्यात यावी.
अशा विविध मागण्या पूर्ण करण्यासाठी उपोषणाला सुरुवात केली आहे. उपजिल्हाप्रमुख मुबिन शेख,तालुकाप्रमुख अनिकेत चामाटे,तालुका सचिव मुन्ना येरेकर,तालुकाप्रमुख प्रहार शेतकरी संघटना रघुवीर कारेकर,शहरप्रमुख प्रहार वाहन चालक संघटना सचिन राखुंडे उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या