वणी :
भाजपचा प्रचार म्हणजे फक्त सभा आणि रॅली नव्हे, तर त्याहून अधिक सूक्ष्म नियोजनाचे जाळे. प्रत्येक गल्ली, प्रत्येक वॉर्ड, प्रत्येक कुटुंब, प्रत्येक मतदार—अगदी कोणताही कोपरा सोडलेला नाही. डोअर-टू-डोअर भेटी, कॉर्नर सभा, व्यक्तिगत संवाद, महिला आणि तरुण वर्गापर्यंत मुद्देसूद पोहोच—या सर्वांचा संगम म्हणजे भाजपची निवडणूक रणनीती. शहरातील प्रत्येक घरामध्ये भाजपच्या उमेदवारांनी आपली उपस्थिती नोंदवत विश्वासाचे बंध जुळवले.
नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार विद्या आत्राम यांनी शहर परिसरात घराघरांत जाऊन नागरिकांशी संवाद साधून विकासाचा आराखडा स्वतः समजावून सांगितला. तर माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी संपूर्ण प्रचारयंत्रणेचे नेतृत्व करत, उमेदवारांसोबत वॉर्डनिहाय फेऱ्या मारत मतदारांशी थेट संवाद साधला. कॉर्नर सभा, गल्लीसभा, तरुणांशी थेट संवाद—या सर्व माध्यमांतून त्यांनी एकच संदेश दिला : वणीला विकास हवा असेल, तर वणीला भाजपची सत्ता आणणे अनिवार्य आहे.
यात भर घातली ती अलीकडेच झालेल्या महसूल मंत्री मा. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रचंड गर्दी खेचणाऱ्या सभेने. या सभेतील लोकलाट पाहून भाजप कार्यकर्त्यांना नवसंजीवनी मिळाली. भाषणादरम्यान महसूल मंत्री मा. चंद्रशेखर बावनकुळे यांनी वणीकरांसमोर केलेली ठाम घोषणा—“वणीच्या विकासासाठी कुठलाही निधी कमी पडू देणार नाही. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वणीला निधी देण्याची जबाबदारी स्वीकारली आहे,”—ही वचनबद्धता शहरात अक्षरशः चर्चेचा विषय ठरली.
या घोषणेमुळे वणी मतदारांच्या मनात निर्माण झालेला विश्वास आता अधिक दृढ झाला आहे. भाजप सत्ता आल्यास शहरातील पाणीपुरवठा, रस्त्यांचे जाळे, बाजारपेठ विस्तार, प्रकाशयोजना, क्रीडांगण, पर्यटनक्षेत्र विकास आणि नविन रोजगार संधी—या सर्व मुद्द्यांवर गतीमान बदलांची अपेक्षा नागरिकांनी उराशी बाळगली आहे.
शेवटच्या दिवशी शहरातील वातावरणाने वेगळेच रूप धारण केले होते. रस्त्यांवर उमटणारा कमळाचा जयघोष, तरुणांच्या मोटारसायकलींवरील भाजपचा भगवा, महिलांचा उत्साह, घराघरातून मिळणारा प्रतिसाद आणि भाजप उमेदवारांना मिळणारा अनपेक्षित पाठिंबा—या सर्वांनी मिळून वणीतील राजकीय समीकरणात एक स्पष्ट संदेश दिला आहे : वणीत कमळ फुलण्यासाठी सज्ज आहे.
निवडणूक कोण जिंकणार याचे चित्र आता हळूहळू स्पष्ट होत असून वणीमध्ये भाजपची लाट जोरात असल्याचे वातावरणच बोलके बनले आहे. नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार विद्या आत्राम यांना मिळणारा वाढता प्रतिसाद आणि माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांचा मजबूत प्रभाव यामुळे अंतिम क्षणीही भाजपची बाजू अधिक भक्कम दिसत आहे.






टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या