Type Here to Get Search Results !

एक महिन्याचं लग्न, दोघांनी विहिरीत घेतली उडी

‎मारेगाव :           

‎       सगणापूरमध्ये एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आहे. अवघ्या एक महिन्यापूर्वीच लग्न झालेल्या नवविवाहित जोडीने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. या घटनेने संपूर्ण गावाला मोठा धक्का बसला आहे.

‎          आशिष रमेश धानोरकर (२४) आणि करिष्मा आशिष धानोरकर (१९) या दोघांनी सोमवारी रात्री साडेआठच्या सुमारास नवरगाव शिवारातील एका शेतातील विहिरीत उडी घेतल्याचे समोर आले. दोघांचे मृतदेह विहिरीतच आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली.

‎         विवाहाला केवळ ३० दिवस झाले होते. नव्या आयुष्याची स्वप्ने रंगवणाऱ्या या तरुण दांपत्याने असे पाऊल उचलावे, यावर कोणाचाच विश्वास बसत नाहीये. गावकऱ्यांच्या डोळ्यात अजूनही अश्रू आहेत.

‎       पोलिसांनी सांगितले की, आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप समजले नाही. तपास सुरू आहे. मारेगाव पोलिस ठाणेदार श्याम वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही चौकशी चालू आहे. मृत आशिष यांच्या पश्चात आई-वडील आणि दोन विवाहित बहिणी असा परिवार आहे. या घटनेमुळे धानोरकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad

Healthy Indian Youth Image